डिश
मधील चिवडा खाऊन झाल्यावर खाली
उरणारा मसाला असतो ना ... जिरे-मोहरी, मिरची, कडीपत्ता, लसूण .... टाकून देतो आपण… चिवडा
तर खाऊन झालेला असतो
ना… पण ज्याच्यामुळे तो चिवडा चविष्ट
झालेला असतो तो मसाला? …. कडवट
असतो ना?... मग काय करतो
आपण तो मसाला? …. खरं तर त्यानेच
त्या भाजक्या पोह्यांना चिवड्याचं रुप दिलेलं असतं,
चव दिलेली असते…….
आपलं सुद्धा
काहीसं तसंच असतं!…. आपलं आयुष्य आपण एन्जॉय करुन घेत असतो. आणि आपल्या घरात, आसपास सुद्धा अशीच काही शिल्लक
उरलेली माणसं असतात. ज्यांचं बोलणं, वागणं, दटावणं, रागावणं आपल्याला त्या शेवटी उरलेल्या
खारट मसाल्या सारखं वाटतं. तिखट.. खारट... पण खरं पाहता
घरा-दाराला पुढं आणणारी, रंग-
रुप आणणारी हीच मुख्य माणसं
असतात. त्यांच्यामुळेच आपल्या घराला घरपण असतं… आणि
आयुष्याला चव...!