शुक्रवार, २९ एप्रिल, २०११

संस्कृती ..... आमचं बाळ!

संस्कृती....... आमचं दीड वर्षाचं बाळ.
एकदम स्वच्छंदी, बिनधास्त,  खट्याळ, दंगेखोर  आणि तेवढंच गोड आणि गोजिरवाणं. आम्ही तिला लाडाने 'सई' म्हणतो.
२००९ मधल्या दिवाळीतला सई चा जन्म.
दीपावली म्हणजे हिंदू संस्कृतीतला खूप मोठा साजरा केला जाणारा सणलक्ष्य दिव्यांनी सारा  आसमंत  उजळून टाकणारा सण, ३६ कोटी देव पोटात असलेल्या गो-मातेच्या पूजेचा 'वसू-बारस'चा सण, धन-धान्याने भरभरून घरामध्ये प्रवेश करणाऱ्या लक्ष्मीदेवीचा 'धनत्रयोदशी'चा सण, लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करण्याचा 'लक्ष्मी-पूजना'चा सण, 'विक्रम संवत्सर' सुरु  करणारा  कार्तिक  महिन्यातील  'बलिप्रतिपदे'चा सण, बहिण-भावाच्या पवित्र  नात्याचं बंधन दृढ करणारा 'भाउबिजे'चा सण, श्रीकृष्ण भगवानांच तुळशीबरोबर लग्न लावण्याचा सणलक्ष्य दिव्यांनी अंगण आणि खूप साऱ्या फटक्यांनी सारा आसमंत उजळून टाकण्याचा सण, दारामध्ये रांगोळी आणि छतावरती आकाशदिवा लावण्याचा सण, दीपावली म्हणजे लाडू-चिवडा आणि चकली-करंजी च्या फराळाचा सण, दीपावली म्हणजे पाहुण्यांचा पाहुणचार, दीपावली म्हणजे तुळशीपुढे रांगोळी आणि दिवळीमध्ये दिवा लावण्याचा सण. अशा या वसू-बारस, धन-त्रयोदशी, नरक-चतुर्दशीलक्ष्मी-पूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज अशा दिवसांच्या लख-लखत्या  दिव्यांनी  दिपऊन टाकणाऱ्या दिपावली उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २००९ मधील अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये 'धन-त्रयोदशी' दिवशी आमच्या गौरीनं एका गोड मुलीला जन्म दिला. "लक्ष्मी घरी आली, लक्ष्मी घरी आली" असेच सर्वजण म्हणू लागलेकारण दिवाळीतल्या धनतेरसचा तो दिवस! विशेष म्हणजे त्या हॉस्पिटलचे मालकमुख्य डॉक्टरांचा जन्म सुद्धा धनतेरसचा आणि म्हणून त्यांचंही नाव त्यांच्या आई-वडिलांनी धनंजय ठेवलेलं. त्यामुळे त्यांनाही आनंद झाला. बाळाला सुती कपड्यामध्ये गुंडाळून बाहेर आणलं आणि डॉक्टरांनी आमच्या आईच्या मांडीवर ठेवलं आणि म्हणाले, "लक्ष्मी आलीये तुमच्या घरी, मुलीचं नाव  लक्ष्मी नाहीतर धनश्री ठेवा". जन्मतःच ते बाळ खूप सुंदर आणि गोजिरवाणं होतं. लुकलुक आणि किलकिले डोळे करून ते सगळीकडे पाहत होतं. आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतरचं जग कसं असतं ते पाहत होतं. हलकेच मधेच एक छोटासा .. करून आळस देत होतं. आमची 'ज्ञानेश्वरी' आणि 'श्री'...... म्हणजे आमच्या मोठ्या बंधूंची मुलं..... विशेष कुतूहलानं तिच्याकडे पाहत होती. छोटंसं बाळ कसं असतं, केवढुसं असतं.... हे मोठ्या उत्कंठेनं पाहत होती. खरच! ....एक वेगळाच अनुभव होता तो.
मग संध्याकाळी आम्ही डॉक्टरांना एक छान पुष्प-गुच्छ देऊन त्यांनाही त्यांच्या वाढ-दिवसांच्या शुभेच्छा दिल्या. खूप आनंद वाटला त्यांना. मग बर्फी वाटणं झालं. सगळीकडे फोनाफोनी झाली. ज्यांना ज्यांना हि बातमी कळवली ते म्हणाले, "व्वा, लक्ष्मी आली घरी तुमच्या!".
सांगण्याची गोष्ट म्हणजे माझा हि जन्म १९७९ सालच्या "देव-दिवाळी" दिवशीचा. गौरीचा जन्म "गणेश-चतुर्थी" चा. आमच्या आप्पांचा जन्म "संकष्टी-चतुर्थी"चा, "श्री" चा जन्म तर आमच्या गावचे ग्राम-दैवत   असलेल्या "भैरवनाथ" यात्रेच्या दिवशीचा. दर वर्षी "श्री" चा वाढ-दिवस आम्ही यात्रेच्या दिवशी म्हणजेच चैत्रातील कृष्ण-पक्ष "कालाष्टमीला साजरा करतोमग याला पूर्व-पुण्याई म्हणा किंवा coincidence म्हणा!  

लोकं बोलली कि लक्ष्मी घरी आली, तेही धन-त्रयोदशी दिवशी मग आता धन-लाभ होईल वगैरे वगैरे. पण माझा अशा गोष्टींवर काही फारसा विश्वास नाहीआणि या कलियुगामध्ये तर नाहीच नाहीहा!! नाही म्हणता-म्हणता, तिच्या जन्मानंतर काही गोष्टी नक्कीच घडल्या; जशा कि आम्हाला नवीन वास्तू चा ताबा मिळाला, मला परदेशी जाण्याची संधी मिळाली, पगार-वाढ झाली आणखीही छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या. पण मी तर हा योगायोग समझतो. आणि असेलच खरोखर यामध्ये काही तथ्य  तर ती आमच्या आजोबांची आणि आई-आप्पांची पुण्याई म्हणेन मी!

मग आमचं बाळ हळू-हळू मोठं होत गेलं. पालथं पडू लागलं, मग पुढे सरकू लागलं, मग बसू लागलं, मग रांगू लागलं, मग उभं राहू लागलं आणि आता साऱ्या घरभर पळत असते. घर डोक्यावर घेणं काय असतं ते आता आम्हाला समझतंय.
तिचं बारसं करताना सगळ्यांना मोठं प्रश्न पडला, तो म्हणजे..... बाळाचं नाव काय ठेवायचं? ... 'धनश्री' किंवा 'लक्ष्मीअसं ज्येष्ठ मंडळी सुचवत होती. पण बाळाच्या मामाला काही ही नावं रुचेनातमग काही नावं 'स्वानंद'ने (म्हणजे बाळाचे मामा)  सुचवली, बाळाच्या आईने काही नावं सुचवली, दोन्ही आज्जी-आजोबांनीही नावे सुचवलीपण एक मात्र मी ठरवलेलं कि mod नाव मला अज्जिबात नको होतं. आमच्या "वारकरी-सांप्रदायिक" घराण्याला शोभेल असं आणि ज्यातून आपली संस्कृती जपली जाईल असं नाव हवं होतं. मग जेव्हा आई-आप्पांना आणि नाना-वहिनींना मी "संस्कृती" हे नाव सांगितलं तेव्हा त्यांनाही ते आवडलं, गौरी-स्वानंदलाही आवडलं. मुख्य म्हणजे बाळाच्या आत्त्याला तर फारच आवडलं आणि  "आत्त्या"  तर असते बाळाचं नाव ठेवणारी.
विशेष गोष्ट म्हणजे, आमच्या मोठ्या बंधूंच्या म्हणजेच 'नाना'च्या मुलीचं नाव आई-आप्पानी "ज्ञानेश्वरी" ठेवलेलं आणि मुलाचं "श्री"तेज. अशी सगळी छान छान नावं आहेत आमच्या घरामध्ये लहानग्यांची. "संस्कृती" हा शब्द तसा अर्थाने खूप मोठा आहे. आपण जेव्हा "आपली संस्कृती" असं म्हणतो, तेव्हा त्या मागे खूप मोठं भावार्थ आहे

तर.......... असं आमचं बाळ!!! ...... आमची संस्कृती!!!! ....... आता काय काय सांगू तिच्याबद्दल?
संस्कृती जेव्हा जागी असते तेव्हा साऱ्या घरभर "गोजिरवाणी लुडबूड" असते. मिनिट सुद्धा शांत बसत नाही. सारखं काहीतरी हातात हवं असतं. एक वस्तू तिच्या हातून घेतली कि दुसरी वस्तू हवी असते. दुसरी काढून घेतली कि तिसरंच काहीतरी घेतेसगळ्या वस्तू काढून घेतल्या कि मग कुठे खुर्चीवर चढ, टीपॉय  वर  चढ, त्यावरून मग पुन्हा खिडकीच्या ग्यालरी मध्ये चढून बस, तिथे बसून खिडकीची दारं जोरजोरात उघड-झाप कर, खिडकीतून खाली दिसणाऱ्या लोकांना ओरडून ओरडून आवाज देकुठे स्टूल ओढून किचन कट्ट्यापाशी ओढत ने आणि त्यावर चढून कट्ट्यावरचं काहीतरी ओढ, गाद्यां गुंडाळून ठेवलेल्या असतात त्याच्या वरती जाऊन  बस, अंथरून टाकताना बेडसीट  अन्थरताना बेडसीटच्या खाली लप, तिला पकडायला गेलं कि लांब पळून जा, फ्रीजचं दार उघड, त्यातलं काही सांड-मांड, देव्हारयावरच्या  देवांसोबत खेळ, mobile  घेऊन कानाला लाऊन उगाचच आउ आउ करत बस, बाथरूम मध्ये जाऊन नळाचं पाणी सोड, बादलीतल्या पाण्यामध्ये खेळत बस, सोफ्यावर चढ, त्याच्या वरच्या उश्या खाली भिरकाव, टेरेस वर जा आणि रोपांच्या कुंड्यातली माती काढून खाली टाक.... एकदा तर घरामध्ये बंद करून घेतलेलं तिने, मग ओपन टेरेस चं दार तोडावं लागलं होतं. नशीब इथे आमचा 1BHK आहे, जे काही सांड-मांड आणि पडझड होते ती तेवढ्यातच होते. गावी गेलं कि मोठ्या वाड्यासारख्या आमच्या - खोल्यांच्या घरामध्ये तिला कुठे जाऊ  आणि काय काय खाली घेऊ असं होतं. मेडिकल दुकानात जाऊन तर बाटल्या घेऊन पळून येते घरात.
अरे बापरे! असे १७६० उद्योग हि करत साऱ्या घरभर फिरत असते. जरा म्हणून जीवाला शांतता नसते हिच्या. सारखं काहीतरी काहीतरी करत असते. जेव्हा ती झोपलेली असते तेव्हाच घरात शांतता अन्यथा.... दंगा-मस्ती आणि खेळ-कुस्ती!! त्यात 'ज्ञानेश्वरी' आणि 'श्री'ही आता इकडेच ठेवलेत शिक्षणासाठी. मग काय ह्या तिघांचा नुसता दंगा आणि मस्ती. घर डोक्यावर घेतात अक्षरशः. तिघेही मस्तीखोर. तिघेही अशीच शार्प.

पण ह्या दंगा-मस्तीमधे थोडं बारकाईने पाहिलं तर 'सई'ची बुद्धीमत्ता लक्षात येते. अवघं दीड वर्षे वय आहे तिचं. पण खूप गोष्टी तिला आत्तापासूनच कळतायत. आपण काही खात असू आणि तिला हवं असेल तर जवळ येवून '....' करत तोंडाचा '' करते, दूध हवं असेल तर आईकडे जाऊन दुधाच्या बाटली कडे बोट दाखऊन 'दुदु.. दुदु..' करते, साखर सुद्धा साखरेच्या डब्याकडे बोट दाखऊन ओरडून ओरडून मागून घेते आणि जो-पर्यंत तिच्या तोंडात साखरेची चिमट घालत नाही, तो-पर्यंत दंगा करते, पाणी हवं असेल तर 'पा.. पा..' करते. कोठूनही तिला हाक मारली कि खूप बोबड्या बोलात  'काय...?'  असं लगेच response  देते. तिला कडेवर घेऊन तिला म्हटलं ना 'पिल्लू...', 'सई...' कि लगेच 'अं!' करते.  तिला आता गौरीने डोळे, नाक, दात, कान, डोकं, पोट, छुमछुम, असं सगळं कुठे काय दाखवायचं ते शिकवलंय. विचारलं कि लगेच हिचं सुरूच होतंपोट कुठेय सईचं?  म्हटलं कि हि लगेच दोन्ही हातानी पोटावर मारून घेते. डोकं कुठेय सईचं? विचारलं कि हि लगेच डोक्यावर मारून घेते. खूप हसू येतं आम्हाला आणि पाहणाऱ्यांना. सई हसते कशी विचारलं कि उगाचच कृत्रिम हसू आणते, सई रडते कधी विचारलं कि रडल्यावर डोळे पुसतात तशी पुसून दाखवते. विशेष म्हणजे माझा mobile वाजला कि माझ्याच हातात आणून देते  आणि गौरीचा वाजला कि तिचा तिच्याच हातात नेऊन देते. चारवताना एखादी गोष्ट नको असेल तर घास तोंडात घेत नाही आणि जोरजोरात मान हलवते नकारार्थी, नको म्हणून. दाराची  बेल  वाजली कि आमच्या आधी ही पोहोचते कोण आलंय ते पाहायला. 'सई, TV चा  remote आण गं!' म्हटलं कि बरोबर टेबल वर ठेवलेला remote  हातात आणून देते. पेपर दे म्हटलं कि आणून हातात देते. बाहेर काही आवाज झाला, फटाक्यांचा म्हणा किंवा गाडीचा मोठा हॉर्न वगैरे वाजला कि ही लगेच आपल्याकडे पाहते आणि कान  टवकारल्यासारखे   हावभाव करते. '.. ' दे म्हटलं कि या गालावर, ओठांवर आणि मग त्या गालावर असं सांगता अगदी series  मध्ये देते. माया माया कशी करतात विचारलं कि आपल्या दोन्ही गालावर हात फिरवून 'मा.. मा..' करते. सकाळी ही लवकरच उठलेली असते. मी उठे-पर्यंत वेळा येऊन जवळून पाहून जाते कि पापाचे डोळे उघडे आहेत कि बंद आहेत. बंद असले म्हणजे मी झोपलेलो असलो कि निघून जाते. पण मी जागा झालेलो दिसलो कि मग हिची मस्ती सुरु. मग पोटावर येऊन बसणार, अंगावर मला मिठी मारून पहुडणार, मला कुकुचकू करायला लावणार. मग चादर ओढून हिचा लपंडाव सुरु होतो..... गाडीवर कधी आम्ही बाहेर गेलो कि तिला घेऊन गौरी मागे बसते, पण ही पोरगी वाऱ्याने झोपली तरच शांत, नाहीतर उभी राहाउड्या मार,  माझा शर्ट ओढ हे उद्योग हिचे सुरु असतात. तिला खांद्यावर टाकलं कि मग मागे दिसेल त्यांना 'टाटा... टाटा... ' करत असते. सुरुवातीला एक-दोनदा मला कळलंच नाही कि मागून येणारे लोक हात का करताहेतआरशामध्ये पाहिलं नीट तर ते 'सई'शी 'टाटा... टाटा...' चा खेळ खेळत असतात. घरी कोणी नवीन पाहुणा आला कि आधी पाहणार पाहणार आणि मग हळू हळू त्याच्याशी हिचे नखरे सुरु होतात. मग काहीतरी खाऊ नेऊन त्या नवीन दिसलेल्या व्यक्तीच्या हातात देईल. आणि हळू हळू मग त्याच्याशी मैत्री वाढवेल. तिला झोपायचा नसेलच तर कितीही झोका द्या, अज्जिबात झोपत नाही. खेळून खेळून झोपते. हा! खाण्या-पिण्याची थोडी नाटकं असतातच लहान मुलांची. रडायला लागल्यावरही ऐकत नाही. फोनवर बोल म्हटलं कि फोन हिला स्वताच्या हातात हवं असतो मगच ही फोन कानाला लावणार आणि उगाचच पोक्त माणूस असल्यासारखे हाव-भाव करून फोनवर 'आउ... आउ...' करणार. खुप खूप लाडिक नखरे करत असते.

पण काही म्हणा, आमची सई खूपच हुशार आहे असं वाटतं आम्हा सर्वांना. सहाजिकच आहे, सगळ्याच आई-बापांना वाटतं कि आमचं बाळ खूप हुशार आहे. मीही त्यातलाच एक बाप आहे. आणि मी सांगितलेल्या गोष्टींपैकी बऱ्याच गोष्टी इतर लहान बाळांमध्येही कॉमनच असतातनाहीतरी  हल्लीच्या  पिढीत  जन्मलेली मुलं खरच खूप खूप हुशार आणि बुद्धिमान आहेत यात वादच नाहीपण आमच्या सई ला अवघ्या दीड वर्षात ह्या सगळ्या गोष्टी कळतात याचं कौतुक आम्हा सर्वांना नक्कीच खूप खूप आहे. आमचं बाळ आहेच तेवढं गुणी!

आम्ही सगळ्यांनी ठरवलंय, आमची ज्ञानेश्वरी, श्री, आणि संस्कृती या तिन्ही मुलांवर खूप खूप छान संस्कार करायचेत्यांना 'शुभंकरोती कल्ल्याणम..' शिकवायचं, चांगलं बोलायला, वागायला शिकवायचं, जसे संस्कार आमच्या आजोबांनी आणि आई-वडिलांनी आमच्यावर केले तसेच यांच्यावरही करायचे. त्यांना उच्च शिक्षण द्यायचं. त्यांनाही आई-वडीलगुरुजन आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करायला शिकवायचा. आपले सण-वार, आपला वारकरी-सांप्रदायिक वारसा पुढे चालवायला त्यांनाही शिकवायचं. आपली संस्कृती त्यांच्यामध्येही रुजवायची.


आज ही पाखरं आपण लहानाची मोठी नक्कीच करतोय. जेवढं काही चांगलं आणि उच्च देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय. जसं आपल्या आई-वडिलांनी आपल्याला दिलं आणि आपण अजूनही त्यांची सेवा, त्यांच्यावर निष्ठा, त्यांच्यावर प्रेम, त्यांची काळजी करतोय. त्याच प्रमाणे आपण ही आपल्या मुलांवर असेच संस्कार जरूर करतोयपण मित्रांनो, आज  काळ बदललाय. पाश्चिमात्य देशांची कीड हळू हळू आपल्या  देशाला लागू लागलीये. लोक बदललेत, लोकांची श्रद्धा बदललीये. त्यामुळे आपण आपल्या मुलाबाळांना शिकवलेल्या गोष्टींमध्ये कसलीही उणीव पडू देता कामा नयेआपण लावलेल्या इवल्याश्या रोपट्यामध्ये या पाश्चिमात्य गोष्टींची कीड आणि समाजातील वाईट गोष्टींची सावली आपल्या रोपट्यावर पडू देता कामा नये. मला असं वाटतं कि बऱ्याच गोष्टी आपल्या विचारांवर आणि आपण आपल्या मुला-बाळांना काय शिकवतो, काय देतो यावर अवलंबून असतात. त्यासाठी आपल्या संस्कारांचं 'खत', आपल्या मायेचं अन प्रेमाचं 'पाणी' आणि आपल्या संस्कृतीची 'सावली' आपल्या छोट्याश्या रोपट्यामध्ये क्षणा-क्षणाला रुजवत राहा.... एक दिवस ते रोपटं आपल्या उत्तरार्धात नक्की आपल्याला सावली आणि आपुलकीची उब देईलतेवढी ताकद नक्कीच आहे आपल्या संस्कृतीमध्ये!!! 


|| इवलेसे रोप लावियले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी ||