मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१२

नारळ - कोकणची शान




नारळच नव्हे तर झावळ्यांपासून झाडूपर्यंत सर्व काही. कल्पवृक्षच तो. कल्पना करू देणारा वृक्ष. याच्या खाली इतर रोपे, पानवेली वगैरे वाढतात. अशा वृक्षाची लागवड शेतकर्यांना नेहमी फलदायीच. प्राचीन काळी देवदेवता प्रसन्न करण्यासाठी, योग्य ती शिकार मिळण्यासाठी, भुतेखेते घालविण्यासाठी नरबळी दिला जाई. यातून मनुष्यच माणसाचा वध करीत होता. ही स्वार्थापायीची क्रूर हत्या थांबविण्यासाठी पूर्वीच्या ऋषिमुनींनी मध्यस्थी करून नरबळीऐवजी ज्यात नर आहे असा नारळ बळी देण्याचे अर्थान अशाप्रसंगी नारळ फोडण्याचे ठरले आणि यातून दोन डोळे, नाक, मुख, कपाळ, शेंडी असलेल्या नारळाला नराचे प्रतीक म्हणून महत्त्व प्राप्त झाले. वेदकाळात कलशावर नारळ ठेवून त्याची पूजा होऊ लागली. येथून मंगलकार्यासाठी नारळ अत्यावश्यक झाला. आज तर नारळाशिवाय कोणतेही मंगलकार्य अमंगलकार्यही पुरे होऊ शकत नाही किंवा सुरू होऊ शकत नाही. नारळाला ब्राह्मण म्हटले जाते म्हणून तो अर्पण करताना त्याची शेंडी काढली जात नाही, मात्र मुसलमानाला तो अर्पण करताना त्याची शेंडी काढली जाते. नारळ फोडल्यावर शेंडी म्हणून वरची कवड अर्पण केली जाते. नराचे रक्त म्हणून नारळाचे पाणी शिंपडले जाते. वंशवृद्धीचे प्रतीक म्हणून नारळाने सौभाग्यवतीची ओटी भरली जाते. हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये नारळ महाफळ, श्रीफळ आहे; म्हणून ते सत्कारप्रसंगी, शुभकार्याप्रसंगी भेट म्हणून दिले जाते. तोरणात बांधले जाते. कोकणी लोकांचे हे श्रीफळ तर कल्पवृक्षच! जेवणात तेलापासून ते जळणात आणि अर्थार्जनात सर्वोपयोगी. नारळाचा कोणताही भाग वाया जात नाही. तो नेहमी नराच्या पाठीशी उभा म्हणून नर-नार-नार--नारळ. तोरणात त्याचे स्थान मोठे. माणसाच्या जन्माच्या पूजेपासून मरणाच्या विधीपर्यंत नारळ हवाच. नारळाचे झाड-नारळी तर दिसायला किती डौलदार. कोकणच्या आगरात तर नारळीबन आहेच; पण हल्ली घराची, बागेची, फार्मची शोभा वाढविण्यासाठीही समोर नारळ लावतात. पूर्वी नारळ फक्त समुद्रकिनारी खारटात होत होता. आता नवीन बियाण्याप्रमाणे तो सर्वत्र वाढतोय. सपाट पाणथळी जागेवरही तो होतोय. घराच्या, मोरीच्या पाण्यावरही आता नारळ वाढू लागलाय. नारळाचे झाड आता पूर्वीसारखे एकाने लावायचे नि त्याची फळे त्याला मिळता पुढच्या पिढीला मिळणार असे राहिले नाही. लागवडीपासून अगदी तिसर्या वर्षी झाड जमिनीत असतानाच त्यावर पाणीदार नारळ धरले जातात. दारात नारळाचे एक झाड असले तरी त्याचे नारळ कुटुंबाला वर्षभर संपत नाहीत. घराभोवती, शेताभोवती आता नारळ वाढू लागले आहेत. शेतीबरोबर नारळाचे पीकही आता सोपे झाले आहे. कृषी विद्यापीठांनी तर नाना प्रकारची रोपे तयार केली आहेत. सोलीव, असोली, शाहळी, ओले-सुके खोबरे अशा स्वरूपात तो कुठेही विकला जातोय. सावित्रीपती सत्यवान वटवृक्षाखाली गतप्राण झाला. तिथेच तो सावित्रीक्रताने जिवंत झाला म्हणून वटसावित्री क्रत केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला वडाची पूजा केली जाते, वड नसेल तर त्याची फांदी स्त्रिया पूजतात. वड माणसाला अनेक उपयोगी असला तरी आज नारळ बहुउपयोगी आहे. यादृष्टीने वटपौर्णिमेला वडाची प्रतीकात्मक पूजा करताना कल्पवृक्ष - नारळाची लागवड व्हायला हवी. आपल्याकडे एखाद्या प्राणी-वस्तूचे, वृक्षाचे संरक्षण, संवर्धन व्हावे म्हणून त्यामागे पुराणकथा, क्रते यांची जोड दिली गेली. यातून वटपौर्णिमा, होळीपौर्णिमा, नारळीपौर्णिमा जन्माला आल्या. मात्र नारळीपौर्णिमेला फक्त नारळच फुटतात, नारळाचे संवर्धन काही होत नाही. शुभकार्य प्रसंगीही नारळच फुटतात. आज मात्र काळाच्या गरजेप्रमाणे नारळ फुटण्याबरोबर नारळारोपण होणे गरजेचे आहे. त्यासाठी नारळ लागवडीसाठी आगरच पाहिजे असे नाही. आवाठातही नारळ होतोय. वर्षभर पाणी असले तर एक नारळी एका कुटुंबाला पुरतील एवढे नारळ देतेय. नारळच नव्हे तर झावळ्यांपासून झाडूपर्यंत सर्व काही. कल्पवृक्षच तो. कल्पना करू देणारा वृक्ष. याच्या खाली इतर रोपे, पानवेली वगैरे वाढतात. अशा वृक्षाची लागवड शेतकर्यांना नेहमी फलदायीच. एकदा का हा कल्पवृक्ष लावला की त्याच्या छायेत आनंदच.
        सौंदर्यशास्त्रात नारळाचे अनेक उपयोग सांगितले आहेत. रोजच्या वापरात नारळाचा वापर करुन सौंदर्यवृध्दी करता येते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं, ते अगदी सार्थ आहे. नारळाच्या झाडाचे आणि त्याच्या फळाचे विविध उपयोग पाहिल्यानंतर त्याला दिलेली ही उपाधी किती योग्य आहे ते लक्षात येतं. आपल्या रोजच्या जीवनात नारळाचा वापर आपण वेगवेगळ्या प्रकारे करत असतो. कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचं महत्त्व आगळं आहे. कलशावर नारळ ठेवून या मंगलकलशाचं पूजन झालं की मनाला एक प्रकारची प्रसन्नता मिळते. आपल्या आहारातही नारळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. कोकण, दक्षिण भारतात तर रोजच्या जेवणामध्ये नारळाचा वाटा फार मोलाचा असतो. दक्षिणेतील स्त्रियांच्या त्वचेला एक प्रकारची स्निग्धता असते ती त्यामुळेच. कच्च्या नारळाच्या तेलाचं मालीश चेहऱ्याला दररोज केल्यामुळे त्वचा मुलायम राहते. नारळाच्या आतील ओल्या खोबऱ्याचा भाग काढावा आणि तो डोळ्यावर ठेवून त्यावर काकडीचं काप ठेवावं. त्याचप्रमाणे हे ओलं खोबरं संपूर्ण चेहऱ्याला लावावं. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. त्यामुळे त्वचा मुलायम बनते. थंडीच्या दिवसात त्वचा आणि ओठ फुटतात. अशावेळी त्यावर नारळाचं तेल लावावं. अनेकांच्या तळपायांना भेगा पडतात. त्यावर रात्री झोपताना पेट्रोलियम जेलीबरोबर नारळाच्या तेलाने मालीश करावी. सकाळी कोमट पाण्याने पाय धुवून टाकावेत. चेहऱ्यावर वेगवेगळे डाग पडले असतील तर अर्धा चमचा कच्च्या नारळाच्या तेलात अर्ध लिंबू पिळावं आणि ते चेहऱ्याला, कोपऱ्यांना लावावं. स्नानाआधी किंवा स्नानानंतर नारळाच्या तेलाने मालीश करावं. त्यामुळेही त्वचा मुलायम राहते.
      
                                                                      संग्राहक.


पोत्याचं आत्मचरित्र....

            


                माझा जन्म कुठे आणि कसा झाला हे मला माहित नाहीपण जसं मला कळतंय, तेव्हा   मी इतर नऊ बांधवांबरोबर एकमेकांमध्ये गुंडाळला गेलो होतो. एका सुतळीने आम्हाला घट्ट बांधून  ठेवलेलं. तेव्हापासूनची माझी आणि सुतळीची मैत्री.... माझी लहानपणापासूनची मैत्रीणच म्हणा ना ती!
आम्ही सगळे रोज एकमेकांशी गप्पा मारत असू. काही जुने आणि वयस्कर बांधवही आमच्यामध्ये  बांधले  गेलेले. त्यांचे अनुभव सांगताना ते म्हणत, "पोत्याचा जन्म लय  वाईटआपल्याला कधीही  कुठेही  कसंही  वापरतात". एकदा  दोघांच्या गप्पा  चाललेल्या  मी  ऐकल्या....  एकजण म्हणाला, "मला  आयुष्यात  नेहमीच  गोड  खायला  मिळालंकारण  माझ्यात नेहमीच  साखर  भरलेली  असते".  दुसरा  म्हणाला, "मी  इकडे  नवीनच  आलोय,  ह्याच्या  आधी मी  मालकाच्या  घरी  नेहमी  ओझी  वाहायचं  काम  केलं. कारण  माझा   मालक   मास्तर होताबदली  झाली  कि  माझ्यामध्ये कधी भांडी भरायचा, कधी पुस्तकंतर कधी कपडे. आणि ह्या गावावरून त्या गावाला, ह्या  गाडीतून  त्या  गाडीत... असा  दर  वर्षी  प्रवास  झालाय माझा. इतर वेळी मालक मला कायम  त्याच्या  माळ्यावर  ठेवतो बांधून.  दर वर्षी मालक  स्तुती  करतो  माझी... म्हणतोहे पोतं लय कामाचं...  दर वर्षी बदली झाली कि खूप  उपयोगी  पडतं आपल्याला सामान न्यायला".
गेली    महिने  आम्ही  सारे  तसेच  धूळ  खात  एका  भटारखान्यात  पडलो  होतो.  गळीत   हंगाम   सुरु   झाला आणि  १०-१०  जणांना  भटारखाण्याबाहेरचं  जग  बघण्याचा  चान्स  मिळायला  सुरुवात   झाली.... तेव्हा  कळलं  कि आम्हाला  सगळ्यांना एका साखर  कारखान्याच्या  गोडाऊन  मध्ये  बंदिस्त  करून  ठेवलेलं.   दिवस  उलटत  गेले  आणि  एक  दिवस  बाहेर  पडण्याची  वेळ  आमच्या  १०  जणांवर  आली. गेली ६ महिने आम्ही एकमेकांबरोबर  सुतळी  बरोबरचनात्याने मैत्रीने  आणि  जिव्हाळ्याने  बांधलो  गेलो होतो.  पण  आता  सगळे  दुरावणार  होतो,  त्यामुळे  दुख  तर  नक्की  झालेलं.  कारखान्याचा एक  कामगार  आला  आणि  आम्हा  १० जणांना  उचलून  घेऊन  गेला.  आमच्या  सुतळी ला  आमच्यापासून  विलग  केलं आणि एका  सुतळ्यांच्या  ढिगाऱ्याकडे तिला  भिरकावलं. आम्ही  १०  जण  वेगळे  होण्याची वेळ आली आणि  दु:खांचा  डोंगर  लोटला.  एका  मोठ्ठ्या  नळकांड्यातून साखरेची  मोठी  धार  एका एका  पोत्यामध्ये  भरली  जात  होती. माझी वेळ आली.  मलाही   उलघडून  त्या  धारेखाली  धरलं  गेलं. १००  किलोची  साखर माझ्यामध्ये   टच्च   भरली.  आणि  एका नवीन सुतळीने  एका  दाबणाच्या   साह्याने  माझं  तोंड  शिवण्यात  आलं.  दाबणाचे  घाव  सोसताना  माझ्या  अंगाची  लाही  लाही  होत  होती.  पण  सुतळीने  समजावलं  कि  "आपलं  जीवनच  असं  आहे  कि   वस्तुंचं  संरक्षण  करणे.  मग  ते  धान्य  असो,  भाजीपाला  असो, भांडी असो  वा  आणखी  काही  वस्तू  असोत.  आणि ह्या  कामामध्ये माझी  साथ  असल्याशिवाय तू  कधीच  यशस्वी  होऊ  शकणार  नाहीस.  जसं  धरणाचं  आणि  धरणाच्या  तटबंदीवरच्या  दरवाजाचं  नातं,  तसंच  तुझं नि माझं  नातं  आहे".  आयुष्याचे  असे  बोध  घेत  माझा  जीवनप्रवास सुरु झाला.  इतर  बांधवांच्या  बरोबर  आगीनगाडीसारखा  पुढे  जात-जात  राहिलो  आणि एका  मोठ्या  हिरव्या  रंगाच्या  शिक्क्याने  माझं  बारसं  केलं.  हिरव्या  शाईने  माझ्या  पोटावर काहीसं  लिहीलं गेलं आणि  तिथून  पुन्हा  त्या  आगीनगाडीच्या  प्रवासाने  एका  मोठ्याश्या  गोदामात  माझी  रवानगी  झाली.  मी  एकटाच नव्हतो,  माझ्यासारखे  खुपजण  होते  तिथे.
४-५  दिवसांनी  अचानक  काही  कामगारांच्या  गोंधळाने  खडबडून  जाग झाली. गोदामाचा  सुपरवायजर  बोलला, ह्यातली  ५०  जाऊ  देत,  बाहेर  तो  ट्रक  उभा आहे ३४१५  नंबरचा  त्यात.  हि  मार्केट  यार्डात  पाठवायचीत".  २-३  हमालांनी  एक-एक करून  पोती  पाठीवर  घेऊन  वाकत  वाकत  सगळ्यांची  उचल-बांगडी  करायला  सुरुवात  केली.… बारवर अचानक धाड  पडावी तसे सगळे लगबगीने जागे झाले.  अचानक माझ्या  शेजारचा  जाताना  बोलला मलासांभाळून  रे  बाबा,  खूप  जोरात  खुपसतात  हे  लोक.  एक  हमाल  माझ्याकडे  सरसावला  आणि त्याच्या   हातातील  आकडीने  माझ्या  कंबरेत  जोरदार  वार  केला. जीव  गेल्यागत  झालं मला, असं  वाटलं  आता हा  माझा  कोथळा  बाहेर काढणार  ओढून. पण  खांद्यावर  मला  उचलून   घ्यायला  त्यांना  जोर  मिळावाम्हणून  ते लोक तो आकडा वापरतात हे तेव्हा कळलं. सांडलेली  साखर  तुडवत  तुडवत  गोदामाच्या  बाहेर पडलो  आणि  ओट्याला  घासून  उभ्या  असलेल्या  ट्रक  मध्ये एका  फळीवरून  तोल  सावरत  सावरत त्या हमालाने  मला  नेलं. झुलत्या  पुलावरून  जाताना  काळजात  धस्स  होतं  तसं  झालं  मला.  नेऊन  इतर बांधवांच्या  ढिगावर  आडवं  टाकलं. बघताबघता  पूर्ण  ट्रक  गच्च  साखरेच्या  पोत्यांनी भरून गेला. ड्राइव्हर आणि क्लीनर ने वरून पूर्ण ताडपद्रीने सगळी पोती झाकली आणि मग आमची गाडी निघाली.
२ - ४ दिवसांनी एका  मारवाड्याचा  मोठ्या  दुकानासमोर  गाडी  उभी  झाली  तेव्हा  जाग  आली. मारवाडी  भाषेतला  दंगा  कानी  ऐकू  येऊ  लागला. साखरेचा  ट्रक  आला  रे,  त्या  बाबू ला  आवाज  दे  आणि बाब्याहऱ्या आणि राज्याला पोती उतरवायला सांग आणि आतल्या गोदामात जाऊन देत सगळी पोती..... झालं .... मग पुन्हा मारवाड्याच्या गोदामात बंदिस्त झालो. आणखी २ दिवस गर्द अंधारात गेले आणि अखेर एका व्यापाऱ्याने मला पैसे देऊन विकत घेतलं आणि त्याच्या दुकानात मला आणखी काही मालाबरोबर डुगडुगने घेऊन आला.
                                                                    क्रमशः