बुधवार, २५ जानेवारी, २०१२

वेळ आणि घड्याळ...





एकदा  वेळ  आणि  घड्याळ  दोघांची  झाली  भेट मस्त.
घड्याळ  म्हणाले  वेळेला,  मी  ठरवतो  तुझं  अस्तित्व.
माझी रूपं किती वेगवेगळी आणि छान छान मस्त.
किंमत आता माझी जरा झालीयेही स्वस्त.
असलं माझं आयुष्य जरी नेहमीच व्यस्त,
माझ्या चालण्याची चाकरमान्यांना  आहे मोठी भिस्त.

वेळ चिडली मग घड्याळावर, म्हणाली आता मी नाही बसणार स्वस्थ.
नाही दिली चावी तुला तर होऊन जातोस तु सूस्त.
कधीही  बंद पडतोस  आणि  करतोस  माणसाला  ग्रस्त.
मीच  करते  भास्कराचा  उदय  आणि  अस्त.
प्रत्येक ऋतूमध्ये माझीच रूपं असतात नेहमी मस्त.
मी जर थांबले तर सारं जग होईल निद्रीस्त.

दोघांची भांडणं पाहून मग माणूस झाला घायाळ.
म्हणाला, पाहून आम्ही वेळ लावतो आमचं घड्याळ.
दोघेही मदत  करता  आम्हाला कळायला वेळ-काळ.
वेळेशी जोडलिये आमच्या रोजगाराची नाळ.
दोघांना पाहून कळते  आम्हा कधी आहे सकाळ अन् कधी संध्याकाळ.
नका लढू लढाई अस्तित्वाची अशी, करा भांडणांची टाळाटाळ.



कविता लिहिलेली
तारीख: २५/०१/२०१२
स्थळ: SAINT-GOBAIN, अंधेरी(पूर्व), मुंबई.





बुधवार, १८ जानेवारी, २०१२

स्वच्छंदी


माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.



भिरभिर मन फुलपाखरासारखं उडू द्यावं.
कधी या फुलावर कधी त्या कळीवर मन-मुराद फिरू द्यावं.
कधी आठवणींच्या  साम्राज्यात हरवून  जावं. 
तर कधी भविष्याचा वेध ही घेत राहावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.

उघड्या  डोळ्यांनी  मोठ्ठं  स्वप्न पहावं.
उरात  स्वप्न  घेऊन  मनाला  उंच  उंच  उडू  द्यावं.
यशाच्या आकाशात उंच भराऱ्या मारू द्यावं.  
स्वप्नापुर्तीनंतर  मग  डोळे  भरून, छाती फुलवून हसावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.

कितीही मोठा झाला माणूस तरी मनाने मात्र जमिनीवरच रहावं.
कधी मित्रांच्या घोळक्यात अगदी कट्ट्यावर बसावं.
तुझं कसं, माझं कसं म्हणत एकमेकांचं दुखःही वाटून घ्यावं.
बसल्या बसल्या चहाच्या पैशावरून पुन्हा तेच गोड भांडणही व्हावं.  
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.

कधी बदल म्हणून शेताच्या बांधावरून अनवाणीही चालावं.
कधी नदीच्या पाण्यात पाय सोडून तासंतास बसावं.
बसल्या बसल्या, या धावपळीच्या युगात आपण किती वेगाने पुढे आलो हेही आठवावं.
जग किती बदललंय आणि त्याबरोबर आपणही कसे बदललोय हेही पाहावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.

कधी स्वतःचं सुखही दुसऱ्यांना ओंजळ भरून द्यावं.
त्यांचं दुखः मात्र आपण माप भरभरून घ्यावं.
काय आहे फक्त स्वतःसाठी जगण्यात?
सगळ्यांच्या खूप साऱ्या दुवा आणि पूण्य मिळवून जावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.

कधी आजी-आजोबांबरोबर गप्पा माराव्यात.
कधी लहान मुलांबरोबर मनसोक्त खेळावं.
आई-बाबांना घेऊन वर्षातून एकदातरी दूर फिरून यावं.
मुलगा असल्याचं सुख त्यांनाही कधीतरी घेऊ द्यावं.    
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.

मनात  गोष्टी  साठवून  त्यांना  जायबंदी    करावं.
आसुसलेल्या  भावनांना  उलघडून  ठेवावं.
नाहीच वाटलं कि कोणाशी शेअर करावं.
तर कागदावर लिहून मन त्यावर उतरवावं.
माणसानं  नेहमी  कसं  स्वच्छंदी  जगावं.

जे खाऊ-पिऊ  वाटेल  ते  पोटभर  खावं.
मित्रांसंगे  थियेटरला जाऊन कधी सिनेमा-नाटकही पहावं.
उंच इमारतीवर जाऊन कधी खूप वारं खावं.
पहिल्या-वहिल्या पावसात मनसोक्त भिजावं. 
माणसानं नेहमी  कसं स्वच्छंदी जगावं.

३-४ महिन्यातून एकदातरी सहलीला जावं.
मित्र-मैत्रीणीसंगे खुश्शाल भरकटावं.
कधी समुद्रकिनारी पाण्याच्या लाटांवर तरंगावं.
तर कधी गड-किल्ल्यांनाही सर करावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.

कधी-कधी एकटंही बसावं.
काही गोड आठवून गालात हळूच हसावं.
आपला हेवा करतील असं कोणीच नसावं.
सुख-दुखः वाटून घेताना कोणीतरी आपलंही असावं.
माणसानं  नेहमी  कसं  स्वच्छंदी  जगावं.

कधी बाईक घेऊन दूर फिरायला जावं.
मागे रेलून बसणारं कोणीतरी आपलंही असावं.
डोळ्यात डोळे घालून तासंतास गप्पा मारत बसावं.
तिथं डिस्टर्ब करणारं तिसरं कोणीच नसावं.
माणसानं  नेहमी  कसं  स्वच्छंदी  जगावं.

माणसानं  नेहमी  कसं  स्वच्छंदी  जगावं......
भिरभिर मन फुलपाखरासारखं उडू द्यावं....
कधी या फुलावर कधी त्या कळीवर मन-मुराद फिरू द्यावं......




कविता लिहिलेली,
तारीख: १८/०१/२०१२
स्थळ: SAINT-GOBAIN, अंधेरी (पूर्व), मुंबई.       

बुधवार, ११ जानेवारी, २०१२

पाऊस




          कोणी सांगितलं कि पाऊस फक्त पाण्याचाच असतो?
          पाऊस या शब्दावर फक्त मेघांचाच का, हक्क असतो?

          जेव्हा मी एकटा असतो,  
       सुंदर गतकाळाची आठवण आणि आठवणींचा पाऊस बरसतो,
       हरवून त्या आठवणींमध्ये मग डोळ्याचा काठही पाणावतो.

     कधी शाळेतल्या प्रेमळ बाई तर कधी खडूस मास्तरही आठवतो,
     कधी संरांची शाबासकीची थाप तर कधी छड्यांचा मारही आठवतो.

   कधी आईची माया तर कधी तिने प्रेमाने भरवलेला वरण-भातही आठवतो,
   कधी वडिलांची घेतलेली काळजी तर कधी त्यांनी लगावलेला झपाटाही आठवतो.

कधी बहिण-भावांचं प्रेम तर कधी त्यांच्यासोबत एका ताटात खाल्लेला घासही आठवतो,
कधी त्यांच्यासोबत केलेला अभ्यास तर कधी एखादा अविस्मरणीय क्षणही आठवतो.


कधी आज्जीने दिलेली  खडीसाखर तर कधी डिंकाचा लाडूही आवडीने खायचो,
कधी आजोबांचे पाय चेपून द्यायचो तर कधी त्यांची आधाराची काठीही  मी व्हायचो.
    
    कधी बालमित्रांबरोबर विटी-दांडू, गोट्यांचा डाव तर कधी सारीपाठाचा खेळही खेळायचो,
    कधी पोहायला, कधी हुरडा-पार्टीला अन कधी झाडाला बांधलेला झोपाळाही झुलायचो.   

     कधी गणपती उत्सवात, तर कधी मित्रांच्या लग्नाच्या वरातीत मन-मुराद नाचायचो,
     कधी बेंदूर, कधी गोपाळकालाकधी गावची जत्रातर कधी रंग-पंचमीही खेळायचो.

       बालपणीच्या या गोड आठवणी नेहमीच मनामध्ये साठवायचो,
       साठवता साठवता आठवणींचा एक सुखद मागोवा मी तासंतास घ्यायचो.
    
      
       काही हातून  घडलेल्या चुका आठवल्या कि मनाला ते लागतं,
       आयुष्यात मिळवलेल्या गोष्टींची गोळाबेरीज करताना मात्र थकायला होतं.
 
     बालपणीचे हरवलेले क्षण वेचता वेचता मन माझं रडतं,
     अजून खूप सार आयुष्य पडलंय मित्रा, असा विचार करून मात्र गालात हसतं.

   आठवणींचं ओझं खांद्यावर घेऊन फिरायला मन माझं नेहमीच तयार असतं,
   हरवून सोनेरी क्षणांमध्ये आठवणींच्या गावामधून परतूच नये असं वाटतं.

आठवणींच्या पावसात भिजायला मला नेहमीच आवडतं.
चिंब भिजून मग त्यात हरवून जाणंजीवाला  वेड लाऊन जातं.





कविता लिहिलेली:
तारीख: ११/०१/२०१२
स्थळ: SAINT-GOBAIN, अंधेरी(पूर्व), मुंबई.