माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
भिरभिर मन फुलपाखरासारखं उडू द्यावं.
कधी या फुलावर कधी त्या कळीवर मन-मुराद फिरू द्यावं.
कधी आठवणींच्या साम्राज्यात हरवून जावं.
तर कधी भविष्याचा वेध ही घेत राहावं.
तर कधी भविष्याचा वेध ही घेत राहावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
उघड्या डोळ्यांनी मोठ्ठं स्वप्न पहावं.
उरात स्वप्न घेऊन मनाला उंच उंच उडू द्यावं.
उरात स्वप्न घेऊन मनाला उंच उंच उडू द्यावं.
यशाच्या आकाशात उंच भराऱ्या मारू द्यावं.
स्वप्नापुर्तीनंतर मग डोळे भरून, छाती फुलवून हसावं.
स्वप्नापुर्तीनंतर मग डोळे भरून, छाती फुलवून हसावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
कितीही मोठा झाला माणूस तरी मनाने मात्र जमिनीवरच रहावं.
कधी मित्रांच्या घोळक्यात अगदी कट्ट्यावर बसावं.
तुझं कसं, माझं कसं म्हणत एकमेकांचं दुखःही वाटून घ्यावं.
बसल्या बसल्या चहाच्या पैशावरून पुन्हा तेच गोड भांडणही व्हावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
कधी बदल म्हणून शेताच्या बांधावरून अनवाणीही चालावं.
कधी नदीच्या पाण्यात पाय सोडून तासंतास बसावं.
बसल्या बसल्या, या धावपळीच्या युगात आपण किती वेगाने पुढे आलो हेही आठवावं.
जग किती बदललंय आणि त्याबरोबर आपणही कसे बदललोय हेही पाहावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
कधी स्वतःचं सुखही दुसऱ्यांना ओंजळ भरून द्यावं.
त्यांचं दुखः मात्र आपण माप भरभरून घ्यावं.
काय आहे फक्त स्वतःसाठी जगण्यात?
सगळ्यांच्या खूप साऱ्या दुवा आणि पूण्य मिळवून जावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
कधी आजी-आजोबांबरोबर गप्पा माराव्यात.
कधी लहान मुलांबरोबर मनसोक्त खेळावं.
आई-बाबांना घेऊन वर्षातून एकदातरी दूर फिरून यावं.
मुलगा असल्याचं सुख त्यांनाही कधीतरी घेऊ द्यावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
मनात गोष्टी साठवून त्यांना जायबंदी न करावं.
आसुसलेल्या भावनांना उलघडून ठेवावं.
आसुसलेल्या भावनांना उलघडून ठेवावं.
नाहीच वाटलं कि कोणाशी शेअर करावं.
तर कागदावर लिहून मन त्यावर उतरवावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
जे खाऊ-पिऊ वाटेल ते पोटभर खावं.
मित्रांसंगे थियेटरला जाऊन कधी सिनेमा-नाटकही पहावं.
उंच इमारतीवर जाऊन कधी खूप वारं खावं.
पहिल्या-वहिल्या पावसात मनसोक्त भिजावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
मित्रांसंगे थियेटरला जाऊन कधी सिनेमा-नाटकही पहावं.
उंच इमारतीवर जाऊन कधी खूप वारं खावं.
पहिल्या-वहिल्या पावसात मनसोक्त भिजावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
३-४ महिन्यातून एकदातरी सहलीला जावं.
मित्र-मैत्रीणीसंगे खुश्शाल भरकटावं.
कधी समुद्रकिनारी पाण्याच्या लाटांवर तरंगावं.
तर कधी गड-किल्ल्यांनाही सर करावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
कधी-कधी एकटंही बसावं.
काही गोड आठवून गालात हळूच हसावं.
आपला हेवा करतील असं कोणीच नसावं.
सुख-दुखः वाटून घेताना कोणीतरी आपलंही असावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
कधी बाईक घेऊन दूर फिरायला जावं.
मागे रेलून बसणारं कोणीतरी आपलंही असावं.
डोळ्यात डोळे घालून तासंतास गप्पा मारत बसावं.
तिथं डिस्टर्ब करणारं तिसरं कोणीच नसावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं.
माणसानं नेहमी कसं स्वच्छंदी जगावं......
भिरभिर मन फुलपाखरासारखं उडू द्यावं....
कधी या फुलावर कधी त्या कळीवर मन-मुराद फिरू द्यावं......
कधी या फुलावर कधी त्या कळीवर मन-मुराद फिरू द्यावं......
कविता लिहिलेली,
तारीख: १८/०१/२०१२
स्थळ: SAINT-GOBAIN, अंधेरी (पूर्व), मुंबई.
Khup Chhan Kavita lihiliyes Pankaj. Mala khup awadali.
उत्तर द्याहटवा