गुरुवार, ५ जानेवारी, २०१२

कधी - कधी




कधी कधी मनाला वाटतं, असं व्हावं कि,

बस मध्ये बसावं पण ऑफिसलाच जाऊ नये,
गेलोच आपण तर बॉस ऑफिसलाच येऊ नये,
डेव्हलपमेंट व्हावी पण टेस्टींगच होऊ नये.

विकली स्टेटस रिपोर्ट कधीच देऊ नये,
नुसतं मेल चेक करत बसावं आणि कोणाचंच लक्ष असू नये,
रोज मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करावं आणि बॉसला कधीच कळू नये.

क्लाईंट सुट्टीवर जावा आणि लवकर परत येऊच नये,
कॅफेटेरीया मध्ये जाऊन कलीगबरोबर गप्पा मारत बसावं अन् बॉसने बोलावूच नये,
नेहमी पिकनिकला जावं पण परतच येऊ नये.

सगळे सण-वार शनिवार-रविवारला जोडून यावे अन् मोठ्ठ्या  वीक-एंडला घरी  जावं,
दर सोमवारी उशिरा उठावं अन् निवांत दुपारचं ऑफिसला जावं,  
दर आठवड्यात कसलंतरी सेलेब्रेशन असावं आणि आपण ते अॅटेंड करावं.    

आपण कामच करू नये आणि तरीही सॅलरी घ्यावी,
जी मनापासून आवडते ती आपली व्हावी,
पावसात चिंब भिजावं  आणि मोठ्ठ्याने गाणी म्हणावी.

जगाला साऱ्या विसरून पुन्हा लहान व्हावं,
गर्दीपासून दूर एक नवीन जग बनवावं,
सगळं आयुष्य बस्स,  असंच जगावं.

कधी कधी  मनाला वाटतं, असं व्हावं कि .......



कविता लिहिलेली,
तारीख: ०५/०१/२०१२  
स्थळ: SAINT-GOBAIN, अंधेरी(पूर्व), मुंबई.

1 टिप्पणी:

  1. च्यायला हा कुठला पंटर आणला आहे पकडून .. तुमचा तरी फोटो लावायचा ..

    बाकी कविता नेहमी सारखी फक्कड .. रापचिक

    - निलेश

    उत्तर द्याहटवा